Posts

Showing posts from July, 2025

नाथस्वामी मठ बातमी

मुंबईत नाथस्वामी बेकरी मठातर्फे  ५०० गरजू विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप मुंबई :(रविंद्र कुडाळकर, मुख्य प्रतिनिधी )                                                                   मुंबईच्या लोअर परळ भागातील श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नाथस्वामी बेकरी मठातर्फे ५०० गरजू आणि होतकरू विद्यार्थ्यांना परमपूज्य सद्गुरू श्री.नाथस्वामी यांच्या हस्ते उत्साही वातावरणात हजारो शुभ चिन्हांकित वह्यांचे वाटप करण्यात आले. नाथस्वामी बेकरी मठातर्फे सातत्याने बहुविध समाजोपयोगी कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. त्याच्याच एक भाग म्हणून परब्रह्म भगवान स्वामी समर्थ महाराज, बुद्धी दैवत गणपती आणि सरस्वती माता यांचा आशीर्वाद लाभून विद्यार्थी शालेय जीवनात यशस्वी व्हावेत आणि त्यांना थोडी मदत मिळावी या उद्देशाने गरजू विद्यार्थ्यांना नुकतेच वह्यांचे वाटप करण्यात आले. बेकरी मठाच्या या स्तुत्य उपक्रमाबद्दल अनेकांनी समाधान व्यक्त केले. यावेळी पालक, ...

MMPS news

Image
 मराठी पत्रकार संघात  नाट्य शुक्रवार, प्रेक्षकांना मोफत प्रवेश                                            मुंबई  : प्रतिनिधी                                      मराठी पत्रकारितेच्या इतिहासात आपला स्वतंत्र ठसा उमटवणाऱ्या  नाट्य शुक्रवार, या उपक्रमाची  अधिकृत घोषणा मंगळवारी मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप चव्हाण यांनी केली.                                                  या उपक्रमांतर्गत दर महिन्याच्या चौथ्या शुक्रवारी संघाचे लोकमान्य सभागृह प्रायोगिक नाटकाच्या मोफत सादरीकरणासाठी उपलब्ध करून दिले जाणार आहे.  नवोदित व प्रायोगिक रंगभूमीसाठी हे व्यासपीठ खुले असणार असून नाट्यप्रेमींना नाट्यप्रयोगांचा नि : शुल्क आनंद देण्याची संध...

रंजितदादा दत्त

Image
झवेरी बाजार सार्वजनिक श्री गणेश पूजा मंडळाची महत्वाची बैठक मुंबई : प्रतिनिधी                                            ९ जुलै रोजी, जावेरी बाजार सार्वजनिक श्री गणेश पूजा मंडळाचे अध्यक्ष रणजित दत्ता यांच्या अध्यक्षतेखाली गणेश चतुर्थीनिमित्त जनतेला आणि पर्यटकांना मदत करण्यासाठी एक महत्वाची बैठक आयोजित करण्यात आली होती.  रणजित दत्ता यांनी पत्रकारांना सांगितले की, जावेरी बाजारातील सुवर्णकार आणि व्यापारी गेल्या २२ वर्षांपासून धार्मिक जनतेसाठी गणेश पूजा आयोजित करत आहेत आणि २०२५ मध्ये श्री गणेश पूजा आयोजित करण्यासाठी पुढील योजना तयार करण्यासाठी अलिकडेच झालेल्या महत्वाच्या बैठकीत विविध मुद्द्यांवर चर्चा करून काही महत्वाचे निर्णय घेण्यात आले. जे खाली दिलेल्या उपक्रमांमध्ये समाविष्ट आहेत. १) नेत्र तपासणी आणि मोफत चष्म्याचे वाटप (नायर रुग्णालयाच्या सहकार्याने). २) रक्तदान शिबिर: - टाटा हॉस्पिटल, जे.जे.  महानगर रक्त पिडी ३) कामा हॉस्पिटल             ...

BMC Election

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा बार ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीत उडणार? निवडणुका तीन टप्प्यात होण्याची शक्यता मुंबई : रविंद्र भोजने                               स्थानिक स्वराज्य संस्थातंर्गत महापालिका निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. कार्यकर्ते, पुढारी, नेते, नगरसेवकांचा गेल्या पाच वर्षांचा वनवास आता संपणार आहे. आता शहराशहरात आणि गावागावात चैतन्य संचारणार आहे. जिल्हा परिषदा, पंचायत समिती, नगर पालिका, महापालिकांमध्ये निवडणुकीचे वारे घुमू लागले आहे. त्यातच पालिका निवडणुका तीन टप्प्यात घेण्याची शक्यता समोर येत आहे. 1 जुलै पर्यंतची मतदार यादी वापरावी असे राज्य निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांसाठी 1 जुलैपर्यंतची मतदार यादी वापरली जावी असे राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी निर्देश दिले आहेत. विधानसभा निवडणुकीपेक्षा या निवडणुकांमध्ये मतदारांची संख्या वाढेल असा अंदाज आहे. प्राथमिक तयारीसंदर्भात राज्य निवडणूक आयोग आणि जिल्हाधिकारी यांच्यातील बैठक पार पडली ...

बीजी गायकवाड सर, मातंग समाज नेते

Image
लोकशाहीर आण्णाभाऊ साठे विकास महामंडळाचा ४० वा वर्धापन दिन                    मुंबई :  प्रतिनिधी                                लोकशाहीर आण्णाभाऊ साठे विकास महामंडळाचा 40 वा वर्धापन दिन आज 11 जुलै रोजी साजरा करण्यात येणार आहे, अशी माहिती अखिल भारतीय मातंग संघ विघट सर्व समाज सामाजिक टीमचे अध्यक्ष श्री बी जी गायकवाड यांनी दिली. गावकुसाबाहेर असलेल्या बारा बलुतेदारांपैकी मातंग समाजाची अवस्था १९८२ पूर्वी अतिशय  हलाखीची होती. या समाजाला जगण्यासाठी ना गावात घर ना शेतात जमीन होती. समाज अंधारात बुडालेला होता. या समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी 17 जानेवारी 1983 या दिवशी मातंग समाजाच्या इतिहासातील हे भव्य आणि दिव्य मेळावा म्हणून गाव कल्याण जिल्हा ठाणे येथे बाबासाहेब गोपले यांना यश आले.  यापूर्वी दहा वर्षापासून समाजाला एकत्र करण्याकरता हा मेळावा घेण्यात आला. कुसुमताई गोपले आणि बाबासाहेब गोपले यांनी समाज बांधवांसमोर समाजाला एकत्र येण्याचे व त्या...

ओबीसींच्या अस्तित्वासाठी जलसमाधी आंदोलन

ओबीसीच्या अस्तित्वासाठी "जलसमाधी आंदोलन     मुंबई : प्रतिनिधी                                   महाराष्ट्रातील ओबीसी, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग (VJNT, SBC) यांच्या कल्याणासाठी स्थापन झालेल्या **महाज्योती** (महात्मा ज्योतीबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था) आणि मराठा-कुणबी समाजासाठी स्थापन झालेल्या **सारथी** (छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था) यांच्यातील आर्थिक तरतुदींमध्ये प्रचंड असमानता असल्याचे धक्कादायक तथ्य समोर आले आहे. ही आकडेवारी राज्य सरकार आणि अर्थमंत्री अजित पवार यांच्या सामाजिक न्यायाच्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करते. ### **सारथीला मोक्याच्या जागा आणि प्रचंड निधी** सारथी संस्थेला, जी मराठा-कुणबी समाजासाठी (महाराष्ट्राच्या ११-१३% लोकसंख्या) कार्यरत आहे, राज्य सरकारने मोठ्या प्रमाणात जागा आणि निधी उपलब्ध करून दिला आहे. खालील तपशील याची साक्ष देतो: - **पुणे मुख्यालय**: ४१ गुंठे, ८७ कोटी रुपये - **कोल्हापूर**: १.८५ हेक्टर, ...